आकाशाची निळी निळाई
त्यावर दुलई शुभ्र पांढरी
कुणी उधळली निलपरी वरी
ही कापसाची पिसे अशी?
रविकर तो लयास जाई
दाटदाटली पिसांची दुलई
अलवर गंध अंधाराचा तोही
पिसा पिसांवर दाटुनी येई!
आकाशाची निळी निळाई
त्यावर दुलई शुभ्र पांढरी
कुणी उधळली निलपरी वरी
ही कापसाची पिसे अशी?
रविकर तो लयास जाई
दाटदाटली पिसांची दुलई
अलवर गंध अंधाराचा तोही
पिसा पिसांवर दाटुनी येई!
भेटावं लागतं कधीतरी
आपल्याला, आपल्याच मनाला...
आपणच कधीकधी स्वतःचाच
येतो राग, होते चिडचिड
आपलीच एखादी कृती,
विचार बोचत राहतो
टोचत राहतो जिव्हारी लागतो
मन खात राहतं
स्वतःलाच!
अन मग शरीर
मनाला शांत करायला
स्वतः खात राहतं
अरबट चरबट
समोर दिसेल ते
मग तर काय
शरीराही चिडतं, कावतं
संप करतं
नाही तर सरळ
भडाभडा ओकून टाकतं
आणि मग तेव्हा जाणवत
गडबड आहे काहीतरी
हुकतय काहीतरी चुकतंय काही तरी
शरीर थकून जातं
मन तर कधीच सुकलेलं...
मग एखादी शांत संध्याकाळ
हातात कॉफीचा कप
आणि आपलीच आपल्याला सोबत!
निवळत रहातं आकाश
झिरपत जातो सायंप्रकाश;
हळूहळू मनातही!
काही तरी उलगडू लागतं
सात कप्प्यातलं
भळभळून व्हायला लागतं
खोल थिजलेल्या जखमा,
कोण कुठले दुखरे आप्त
तरंगू लागतात
मनाच्या तळ्यात
धुवत धुवत होऊन जातं
सारं मन अवकाश ...
डोळ्यातून पाझरतं काय काय
चूक, संताप, चिडचिड,
असहाय्यता, आक्रमकता,
एकटेपणा, भ्रमनिरास,
फसवणूक, निराधार...
सगळं सगळं
भसभसून वाहून जातं.
आणि मग येते
एक नीरव शांतता
आता नसतात कोणीच
राग, लोभ, नसतात क्लिमिषं
नसतात आरोप
नसते अपराधीपण
नसतो एकटेपणा
आता मन मनाशीच बोलू लागतं
काय, कुठे, कसं, किती,
का, कोणी, केव्हा, कशाला...
हळूहळू उलगडत जातात
सारेच प्रश्न!
फक्त ती वेळ यावी लागते.
म्हटलं ना,
भेटावं लागतं कधीतरी
आपल्याला, आपल्याच मनाला!
होने लगी मुलाक़ाते हलके हलके,
बढ़ने लगी वो बाते हलके हलके…
तेरी हँसी से महक उठा हर एक मौसम,
दिल ने सीख लिया मुस्कुराना हलके हलके…
आँखों में सजने लगे रंगीन ख़्वाब कई,
रूह ने ओढ़ ली तेरी चाहतें हलके हलके…
तेरे क़रीब आते ही खिल उठा वजूद,
साँसों में बसने लगी राहतें हलके हलके…
बिन कहे समझ आने लगे सारे अरमाँ,
इश्क़ सिखाने लगा मोहब्बत हलके हलके…
जब तेरा नाम लिया होंठों पर, 'अवल'
ज़िंदगी ने जिना सीख लिया हलके हलके…
---
करते नहीं, शायरी हो जाती है आगे आगे
देखेंगे क्या ग़ज़ल, होती है आगे आगे
इतना ना करो गुरूर, ए हस्ती हम पे,
फ़ना की राह है, सालिक चले आगे आगे
ज़ख़्म भी सज्दा करते हैं, दर ए इश्क़ पे,
हर दर्द बन जाता है, सजदा आगे आगे
मत कर तारीफ़, ये फ़ानी जिस्म की,
रूह का समंदर है, दीदार आगे आगे
पी ली मय ए इश्क़, हमने ख़ामोशी में,
होश जाता रहा, वजूद मिटता रहा आगे आगे
दीदार-ए-यार तो, हो ही चुका 'अवल',
बस रब मिलता है, बंदा खोता है आगे आगे
---
पश्चिम जसजशी काळवंडत जाते,
पूर्वेकडे टेकडी वरचे धुके
खाली गावांत
हळूहळू घसरत येतं.
घरा घरात मिणमिणते,
पिवळे दिवे लागतात.
चुलीमधे लाल केशरी निखारे
धगधगू लागतात.
लोखंडी तवा तापू लागतो.
अन त्यावरच्या भाकरीचा
खरपूस वास दरवळू लागतो.
अन मग धुराड्यातून
धूर बाहेर पडतो,
धुक्याला भिडतो.
भाकरीच्या उबेची
मिठी घालतो.
अन दिवसभराचा ताप,
रात्र अशी कुशीत घेते!
---
दिंडी निघोन गेली कधीची, पहाटेच्या निरवतेस
निर्मल्या सोबत मी मागे, पंढरीची आस.
रामकृष्ण हरी घोष, सर्वांच्या ओठी होता
माझ्या अंतिम यात्रेचा तो, रामनाम होता
सोडला शेवटचा तो श्वास, सुटकेचा होता
माझ्या खुन्याचा तो, अबोल शोक होता
----
{माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता मला साधायची होती. पण इतरांसोबत, इतरांसारखी नाही. त्यामुळे सर्वांच्या बरोबर मी नाही गेले.
सर्वांच्या जगण्याची पद्धत(रामकृष्णहरी घोष) बघण्याचा नादात मी माझी जगण्याची पद्धत शोधायलाच विसरले.
माझ्यातलं चटकन पुढे न होणं, रादर शक्यता असून स्वत:ची वाट ठामपणे न धरणं. यातून माझीच प्रगती खुंटवली. तर हे जे माझ्यातलं झिजकणं आहे ते म्हणजे माझीच मी खुनी असणं.
हे सगळं समजे पर्यंत शेवट जवळ आला. पण हे समजलं म्हणून मी सुटकेचा श्वास सोडला. अन माझ्यातल्या त्या खुन्याला या सगळ्याचे दु:ख ही आहे.}
कॉफीची टेबलं आता मोकळी पडली आहेत
तिथला बुद्धीला चालना देणारा दरवळ
खोल खोल दडपला गेला आहे
कॉफी शॉपमधली एकूणच ये जा मंदावली आहे
रस्त्यावरच्या पहारेकऱ्यांच्या सावल्या हलताना दिसताहेत
क्षितिजावरचे काळे ढग भराभर पुढे सरकत आहेत
लेखकांच्या लेखण्यांवर केशरी राप चढला आहे
अन पानांवर आधीच ..नामाची छपाई झाली आहे
शाळा महाविद्यालयांतून घोकंमपट्टी ऐकू येते आहे
पुस्तकांच्या दुकानातली इतिहासाची पुस्तकं हरवली आहेत
प्रयोगशाळा तर कधीच्याच कुलुप बंद झाल्या आहेत
जुन्या पोथ्यांमधला न समजणारा मजकूर उद्घोषित केला जातो आहे
प्रत्येक विचारी मेंदूवरती परंपरेचा झिरझिरीत पण प्रभावी पडदा सरकवला गेला आहे
सुख समृद्धीच्या चंगळवादाने विचारांवर आपले जाळे पसरले आहे
चार भिंतीतील माझं सुरक्षित जग जोपासलं जातं आहे
त्या घरांचा पाया मात्र खोल खोल रुतत चालला आहे
क्षितीजावरचा सूर्यही हळूहळू दृष्टीआड होतो आहे
उद्या कसा उगवेल, उगवेल तरी का
असा प्रश्न पडणारी माणसं ही हरवत चालली आहेत...
---
जरा जो वाजला, फक्त पाचोळा होता
वसंतातला पानांचा अश्रुपात होताबहारों ने इतना रुलाया है मुझ को
कई बरसातें बरस गई , यारों....
गुल खिले है इतने रंगीन सारे
के रंग जिंदगीका उजडा हुआ है
लदी हुई है टहनी, फलोंसे
पर नीरस हुई है जवान सॉसें
पेडों पर निकले है पत्ते बहार के
बस उजड गया है आशियाना यारों !
1.
You are a parent; not a superparent.
First, you should be calm,
You should be composed.
Only then can you calm and help your child.
You are a parent; not a superparent.
First, you should be happy,
You should be satisfied.
Only then can you comfort and make your child happy.
You are a parent; not a superparent.
First, you should give your child a chance to explore,
A chance to try evreything.
Only then can the child learn and gain experience.
You are a parent; not a superparent.
So just be a parent; happy, satisfied.
and confident.
And you will naturally raise a confident, happy child.
-Arati
----
2.
You are a parent; not a super one.
No need to shine like the blazing sun.
Be calm, be still, let worries fade.
Only then can your child feel safe and stay unafraid.
You are a parent; not a flawless guide.
Be happy and satisfied inside.
When joy and peace in you are found.
Your child will feel that love all around.
You are a parent; not meant to control.
Give your child freedom; that’s your role.
A chance to try, to think, to grow.
That’s how true learning begins to show.
You are a parent; and that’s enough.
You don’t need to always be strong or tough.
Be happy, be sure, let pressure slide.
And raise a confident child with pride.
-Arati