प्रत्येक क्लासिक गोष्ट
दु:खांताचीच का असते
की दु:खांतामुळेच
ती होते क्लासिक?
चला, जरा प्रयोग म्हणून
लैलामजनुचा संसार थाटूत;
जऽरा शुकुंतलेची अंगठी
तिच्या बोटात घट्ट बसवूत.
जमलच तर शिरिफरहानला
बांधू एका गोड धाग्यात,अन
ऑथेल्लो ला शिकवून टाकुत
जगायचं कसं प्रश्नांशिवाय!
पण मग सुटतील का
सगळे प्रश्न, सगळे गुंते;
की नवीनच सुखद प्रश्न
उभे रहातील, आ वासून?
अन मग सुखातांचे,
हे कसले कसले प्रश्न घेऊन
कसं काय चालायची
आपली सामान्य वाट?
कि बरे आपले दु:खान्तच.
कला प्रसवायला तेच बरे
रोजची दु:खं साहणं तरी
जऽऽरा सोपी होतील?