कबूल करणंही कोणाला अस्वस्थ करू शकतं;
हे कधी डोक्यातच आलं नाही.
इतका सरळ, साधा माफीचा मुद्दा;
कधी अडचणीचा ठरू शकतो, कोणाला.
नको ते जोडले जाणारे संबंध
आणि त्या सोबत येणारे मानपान...
जगणं साधं सरळ सोपं का असू नये
कंगोऱ्यांची किनार अन् गालबोटाचा ठिपका
अगदी हवाच का तलम मऊ वसनाला
सळसळ सुटत जाणारं अलवार पोत
हलकेच मनाला स्पर्शून जाणारं निरागस
सगळच कसं झाकोळून झाकोळून...
एक छोटासा हो - नाहीचा गुंता
अन त्यावर डळमळणारा डोलारा
खळ्ळकन फुटून पडलेलं
निर्वाज्य भावभावनांचं जग
अशक्य,अस्वस्थ तळमळ
अन उरलेली निर्विकार पोकळी...
आणि म्हणे जग न
आनंदाने.....
No comments:
Post a Comment