शब्दांइतके दुसरे कोणी
शत्रू माझे झाले नव्हते.
हवे तेव्हा हवे तसे
ते कधी फुटलेच नव्हते,
गद्दार होण्याइतकेही कधी
ते आपलेसे झालेच नव्हते.
दर वेळी, नेहेमी, नेहमी
त्यांचे काम करावे
फक्त डोळ्यांनी, फक्त डोळ्यांनी !
हळूहळू मग, जमली दोस्ती
शब्दांनाच मग ओढ लागली
किती बोलू अन किती नको,
नजर ओलांडूनी पुढे धावले...
अन्
आली अशीही वेळ
निष्प्रभ बनले डोळे - शब्द
अन्
अधरांमधले
थरथरतेपण
पुरे निवाले
संवादीपण !
१२.१०.१९८९
No comments:
Post a Comment